मराठीच्या तासाला प्रत्येक विद्यार्थी बरण्यातील 1 चिठ्ठी आपल्या मित्राला देत व चिठ्ठीत असलेला मजकूर वाचून त्याचा मित्र त्याप्रमाणे लेखन करत. विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन अनुभवायला मिळत होते. त्यामुळे मुले अगदी आनंदाने यामध्ये सहभागी होत होते. याचा फायदा असा झाला की मुले एकमेकांच्या सहकार्याने विविध विषयांवर लेखन करू लागले. विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढली. लेखनाचा सराव होत असल्यामुळे लेखनातील चुका या नगण्य होऊ लागल्या. विद्यार्थ्यांच्या विचारकक्षा वाढल्या. "माझ्या मित्राची चिठ्ठी" याची यशस्वीता लक्ष्यात घेता हा उपक्रम इतरही शाळेत विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असे माझे ठाम मत आहे.
शब्दांकन : कमलेश तुकारामजी सोनकुसळे
काटोल, नागपूर.. 7588691372
www.kamlesh1029.blogspot.in